दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ‘लहरी’ राज्यकर्त्यांच्या अंगावर ‘शहारे’ निर्माण करत आहेत
शेतकरी आंदोलनाने दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या टप्प्यापर्यंत सरकार आणि शेतकरी हे दोघेही बरोबरीत राहिले आहेत. परंतु हा संघर्ष येत्या काही महिन्यांत मात्र आणखी तीव्र होणार आहे. अर्थात या दोन्ही घटकांना पुढचा रस्ता सोपा नाही, तसाच तो स्पष्टही नाही. येथून पुढील डावपेच शेतकऱ्यांसाठी जसे निश्चित नाहीत, तसेच ते सरकारसाठीही निश्चित नाहीत. म्हणून आंदोलनाच्या या टप्प्याला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे.......